तर मित्रांनो सांगायचे तात्पर्य सध्या कोरोनामुळे आपली अवस्था बिर्याणीतल्या खड्यासारखी झाली आहे. कुणाला हा खडा येईल हे सांगता येत नाही. "जगण्यातील सहजता" गेली.
अगदी मदत करणारा हात देखील कोरोनाचा असेल का, दूधवाला, भाजीवाला, किराणावाला जीवनावश्यक वस्तू देताना वस्तू बरोबर काय देईल याची शंका घेऊन जगतोय आपण.
माहीत नाही किती दिवस चालेल हे पण "जगण्यातली सहजता" किती महत्वाची आहे हे आता कळले.
Send in a voice message: https://anchor.fm/positive-perceptions/message